Thursday, September 29, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ४ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ४


Tuesday, September 27, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ३ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ३



Sunday, September 25, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग २ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग २


Thursday, September 22, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १


Sunday, September 18, 2016

झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती : ऋषी श्री. सुभाष पाळेकर




भरपूर उत्पन्नाची, दर्जेदार मालाची, शुन्य खर्चाची, कर्ज मुक्त, चिंता मुक्त, विष मुक्त, कष्ट मुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-किडी मुक्त, दुष्काळ मुक्त, अवकाळी संकट मुक्त अशी ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी–समृद्ध–स्वावलंबी करणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान, अहिंसा व आध्यात्म आधारित शाश्वत कृषी पध्दती…

हया शेतीची काही ठळक वैशिष्ठ्ये: 
  • ही शेतीची पुरातन पध्दती नसून ही निसर्ग, विज्ञान व आध्यात्म आधारित अशी शाश्वत कृषी पध्दती आहे. एका गावरान देशी गाई पासून या पध्दतीनुसार आपण ३० एकर शेती करू शकता - मग ती सिंचित असो किंवा कोरडवाहू असो.
  • या पध्दतीमध्ये आपल्याला ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीने शेणखत तसेच रासायनिक खते, कीटकनाशक, सेंद्रिय खते, गांडूळ-खत अश्या कोणत्याही निविष्टा विकत आणाव्या लागत नाही. तसेच या पध्दतीत १०% पाणी व १०% विजेची आवश्यकता असते; म्हणजेच९०% पाणी व विजेची बचत.
  • या नैसर्गिक शेतीत उत्पादन रासायनिक व सेंद्रिय शेती पेक्षा मुळीच कमी मिळणार नाही, उलट जास्त मिळेल. उत्पादित शेतमाल हा पूर्णतः विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार व स्वादिष्ट असतो त्यामुळे जास्त मागणी व भावही चांगला मिळतो.
  • ही शेती करणारा एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही कारण त्याचा उत्पादन खर्च शून्य आहे.
  • रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे मानव, पशु, पक्षी, पाणी, पर्यावरणाचा विनाश होत आहे. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या सर्वांचा विनाश टाळला जातो व नैसर्गिक संसाधनांची शाश्वतता वाढते.
  • शून्य उत्पादन खर्च, जास्त उत्पादन, उत्तम दर्जा, चांगली मागणी, योग्य भाव अश्या हया शेतीमुळे खेड्याकडून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर रोखता येईल. या सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला पाहिजे.

ऋषी श्री. सुभाष पाळेकर यांंच्‍या शिबीराचे ऑडीओ (Audio) ऐ‍कण्‍याकरीता खालील लिंक वरती क्लिंक करा

झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती - (Audio) MP3

Wednesday, September 14, 2016

देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या आस्थापनेवरील 'कार्यालय सहाय्यक' पदांच्या जागा(IBPS)


       
      देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या आस्थापनेवरील 'कार्यालय सहाय्यक' पदांच्या एकूण १६६३४ जागा आयबीपीएस मार्फत भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३०/०९/२०१६ आहे.

Saturday, September 3, 2016

शेतक-यांसाठी ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी’ स्पर्धा


बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतक-यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे. यामध्‍ये शेतक-यांसाठी शेती, पीके, मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाय, किड नियंत्रन, माती परीक्षण, विमा अशा शेती व त्‍यांच्‍या जीवनाशी निगडीत प्रश्‍नोउत्‍तरे या स्‍पर्धेत विचारण्‍यात येणार आहे. ही स्‍पर्धा १ त १० सष्‍टेंबर २०१६ या दरम्‍यान होणार असून प्रथम दहा, व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे. यास्‍पर्धेत  जिल्‍हयातील शेतक-यांनी सहभागी व्‍हावे. 

शेतक-यांचे मनोधैर्य वाढवून त्‍यांच्‍या जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍यासाठी जिल्‍हयात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्‍हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यातील एक उपक्रम म्‍हणून शेतक-यांसाठी शेतीविषयक निगडीत बळीराजा प्रेरणा प्रश्‍नोत्‍तरे स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेत शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील सदस्य यात सहभागी होऊ शकणार आहे. या स्‍पर्धेचा कालावधी १ ते  १० सप्टेंबर  २०१६ असा राहणार आहे. 

स्‍पर्धेची प्रश्‍नपत्रिका ही शेतक-यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी व ग्रामसेवक यांच्‍याकडून शेतक-यांना उपलब्‍ध होणार आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून प्रश्नांचे उत्तर देतांना नकळतच शेतक-यांना आपण कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध होणार आहे. या सपर्धेत शेतक-यांचे सामाजिक कर्तेव्‍ये, शेतीचे आर्थिक नियोजन, जमीन, पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्‍यासाठी उपयोजना, पिक विमा, पाल्‍याचे विवाह, सेंद्रिय शेती अशा विविध शेती व शेतकरी कुटुंबाशी निगडीत २० गुणांची ही प्रश्‍नपत्रिका राहणार आहे.

स्‍पर्धेचे मुल्‍यमापणासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार असून तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्‍या जाणार आहे.  यात सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम ३ किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे असल्यास त्या स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे.  जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती यापैकी लकी ड्रॉ पदधतीने अंतिम ३ लोकांची निवड करण्‍यात येणार आहे.

पारितोषिकांचे स्‍वरूप
प्रथम बक्षीस   -१०,००० हजार
व्दितीय बक्षीस -७,००० हजार
तृतीय बक्षीस  -५,००० हजार

अधिक माहीती करीता संपर्क
बळीराजा चेतना अभियान
जिल्‍हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
संपर्क-०७२३२-२४४१००

प्रकाश बहादे-९६३७३०५६२३


प्रश्‍नपञिका डाऊनलोड