Saturday, September 3, 2016

शेतक-यांसाठी ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी’ स्पर्धा


बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतक-यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे. यामध्‍ये शेतक-यांसाठी शेती, पीके, मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाय, किड नियंत्रन, माती परीक्षण, विमा अशा शेती व त्‍यांच्‍या जीवनाशी निगडीत प्रश्‍नोउत्‍तरे या स्‍पर्धेत विचारण्‍यात येणार आहे. ही स्‍पर्धा १ त १० सष्‍टेंबर २०१६ या दरम्‍यान होणार असून प्रथम दहा, व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे. यास्‍पर्धेत  जिल्‍हयातील शेतक-यांनी सहभागी व्‍हावे. 

शेतक-यांचे मनोधैर्य वाढवून त्‍यांच्‍या जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍यासाठी जिल्‍हयात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्‍हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यातील एक उपक्रम म्‍हणून शेतक-यांसाठी शेतीविषयक निगडीत बळीराजा प्रेरणा प्रश्‍नोत्‍तरे स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेत शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील सदस्य यात सहभागी होऊ शकणार आहे. या स्‍पर्धेचा कालावधी १ ते  १० सप्टेंबर  २०१६ असा राहणार आहे. 

स्‍पर्धेची प्रश्‍नपत्रिका ही शेतक-यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी व ग्रामसेवक यांच्‍याकडून शेतक-यांना उपलब्‍ध होणार आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून प्रश्नांचे उत्तर देतांना नकळतच शेतक-यांना आपण कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध होणार आहे. या सपर्धेत शेतक-यांचे सामाजिक कर्तेव्‍ये, शेतीचे आर्थिक नियोजन, जमीन, पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्‍यासाठी उपयोजना, पिक विमा, पाल्‍याचे विवाह, सेंद्रिय शेती अशा विविध शेती व शेतकरी कुटुंबाशी निगडीत २० गुणांची ही प्रश्‍नपत्रिका राहणार आहे.

स्‍पर्धेचे मुल्‍यमापणासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार असून तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्‍या जाणार आहे.  यात सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम ३ किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे असल्यास त्या स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे.  जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती यापैकी लकी ड्रॉ पदधतीने अंतिम ३ लोकांची निवड करण्‍यात येणार आहे.

पारितोषिकांचे स्‍वरूप
प्रथम बक्षीस   -१०,००० हजार
व्दितीय बक्षीस -७,००० हजार
तृतीय बक्षीस  -५,००० हजार

अधिक माहीती करीता संपर्क
बळीराजा चेतना अभियान
जिल्‍हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
संपर्क-०७२३२-२४४१००

प्रकाश बहादे-९६३७३०५६२३


प्रश्‍नपञिका डाऊनलोड