Tuesday, August 23, 2016

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

दारिद्र्य रेशे खालील आणि दारिद्र रेशे वरील अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या करिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व नेशनल इंसुरंस का. लिमिटेड यांच्या तर्फे हि योजनाराबवली जात आहे. या योजने अंतर्गत शस्त्रक्रिया / औषधोपचार व फेरतापासणी उपचारांचा लाभ घेता येईल.

जिल्हयांमधील सर्व शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्य सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबववण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतगगत दारिद्र्य रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्र्य रेषेवरील (रु. 1 लक्ष पयंत वार्षिक उत्पन्न असलेल्या) केशरी शिधापञिकाधारक कुटुांबांचा लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय क्रमांक – रागांयो-२०१५/प्र. क. २८०/आरोग्‍य-६  नुसार औरगाबाद, जालना, परभणी, हींगेाली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या 14 शेतकरी आत्महस्ताग्रस्त जिल्हयांतील सर्वच शेतकरी कुटुांबांचा लाभार्थी म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या 14 जिल्हयांतील शुभ्र शिधापञिकाधारक शेतकरी कुटुांबांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापञिका तसेच 7/12 च्या उताऱ्यावर पुढील लाभ देण्‍यात येत आ‍हे. 




अधिक माहीती करीता- टोलफ्री क्र. -१८०० २३३ २२ ००

संकेत स्‍थळ-  राजीव गाधी जीवनदायी आरोग्‍य योजना

राजीव गाधी जीवनदायी आरोग्‍य योजना माहीती पुस्तिका